पानीपत : आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी नव्याने स्थापन केलेल्या पानीपत सहकारी साखर कारखान्याचे पहिले प्रशिक्षण यशस्वी करण्यात आले. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार साखर कारखाना लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. जे शेतकरी आपला ऊस गूळ युनिट आणि आसपासच्या साखर कारखान्यांना अतिशय स्वस्त दरात विक्री करीत होते, त्यांच्यासाठी हा खूप दिलासा देणारा पर्याय आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पानीपतमधील पहिल्या दौऱ्यावेळी २० डिसेंबर २०१४ रोजी शहरातून दहर गावातील या कारखान्याचे स्थलांतर करण्याची घोषणा केली होती. नव्या साखर कारखान्याची पाहणी उप आयुक्त सुशील कुमार सरवान यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सरवान यांनी सांगितले की, हा राज्यातील एक अल्ट्रा मॉडर्न साखर कारखाना आहे. त्याची प्रतीदिन गाळप क्षमता १८,००० क्विंटलवरुन वाढवून ५०,००० क्विंटल करण्यात आली आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. टर्बाईन १०,००० क्विटंल ऊस गाळप करून योग्यरित्या सुरू आहे. हे परिक्षण १०,००० क्विंटल ऊस गाळपासह जवळपास २५ दिवस सुरू राहिल.