हरियाणा: सरस्वती कारखान्याकडून गाळप हंगामातील थकबाकी भागवणे सुरु

यमुनानगर: सरस्वती साखर कारखान्याने गुरुवारी ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सुरुवातीला, कारखाना 21 डिसेंबरपर्यंत पुरवठा करण्यात आलेल्या ऊसासाठी 95 करोड रुपये भागवेल. कारखान्याने 24 नोव्हेंबर ला गाळप अभियान सुरु केले होते, आणि 37 दिवसांनंतर पैसे देण्याचे काम करत आहे. पंजाब ऊस अधिनियमाच्या एका प्रावधानानुसार, साखर कारखान्यांना पुरवण्यात आलेल्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे देणे गरजेचे आहे.

कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष डीसी सिंह यांनी सांगितले की, आम्ही ऊस शेतकर्‍यांचे पैसे भागवणे सुरु केले आहे. सर्वात पहिल्यांदा आम्ही 21 डिसेंबर पर्यंत कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे देय भागवण्यास मंजूरी देत आहोत. माहितीनुसार, कारखान्याने 30 डिसेंबरपर्यंत जवळपास 36 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे.

डीपी सिंह यांनी सांगितले की, ते कारखान्यातील शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी कोविड 19 प्रोटोकॉल चे पालन करत आहेत. आम्ही शेतकर्‍यांना रस्ते सुरक्षेबाबतही जागरुक करत आहोत. आमची पथके दुर्घटनांना रोखण्यासाठी ऊस शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली वर रिफ्लेक्टर लावत आहेत. हरियाणा सरकारने यावर्षी ऊसाच्या दरामध्ये 10 रुपये प्रति क्विंटल ची वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here