रायलसीमा, नेल्लोरमध्ये पावसाने उसासह इतर पिकांचे नुकसान

तिरुपती : रायलसीमा आणि नेल्लोर जिल्ह्यातील अनेक मंडलांमध्ये शेकडो छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आसनी चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाने राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये भाजीपाला आणि केळे, पपई, मिरची, आंबे, टोमॅटो, सुपारी, शेवगा आदी बागायती पिकांची हानी झाली आहे. कापणीनंतर शेतात राहिलेले भातही पावसात भिजले आहे. नेल्लोर जिल्ह्यातील सहा मंडलांमध्ये ३,०२४ हेक्टरमधील कापूस, ऊस, तीळ, मक्का, हिरवा वाटाणा आणि इतर पिके खराब झाली आहेत.

चित्तूर जिल्ह्यातील वेदुरुकुप्पम, सदुम, सोमाला, पुतलपट्टू, पेनुमुरू, एसआर पुरम, गंगाधारा नेल्लोर आणि चित्तूर ग्रामीण मंडलांमध्ये ४,०६८ हेक्टर आंब्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाने चांगल्या पिकांचे उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तेदेपा नेते सी. व्यंकटेश्वर रेड्डी म्हणाले की, पिकांच्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. राज्य सरकारने रायलसीमा आणि नेल्लोरमधील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. नुकसान झालेले धान्य किमान समर्थन दराने खरेदी करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here