भारताचे २०२४-२५ हंगामामध्ये निव्वळ साखर उत्पादन ३० दशलक्ष टन होण्याचा अंदाज : ICRA

नवी दिल्ली: ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२४-२०२५ हंगामासाठी भारताचे निव्वळ साखर उत्पादन ३२ दशलक्ष टनांवरून घटून ३० दशलक्ष मेट्रिक टन होईल, असा अंदाज रेटिंग फर्म ICRA ने वर्तवला आहे. उर्वरित साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाण्याची शक्यता आहे. ICRA चा अंदाज आहे की, एकात्मिक साखर कारखान्यांचा महसूल आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १० टक्क्यांनी वाढेल, ज्याला विक्रीच्या प्रमाणात अपेक्षित वाढ तसेच देशांतर्गत साखरेच्या किमती आणि डिस्टिलरी व्हॉल्यूममधील वाढ कारणीभूत ठरेल.

देशातील अपेक्षित साखर उत्पादन आणि किमतींवर भाष्य करताना, ICRA चे गट प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीशकुमार कदम म्हणाले की, या वेळेस साखर साठ्याची उच्च पातळी अपेक्षित आहे, ज्यामुळे अतिरिक्त साखर इथेनॉल उत्पादनाकडे अधिक वळवता येईल, या अपेक्षेवर आधारित, २०२४ हंगामामध्ये निव्वळ साखर उत्पादन ३२.० दशलक्ष मेट्रिक टनांवरून २०२५ हंगामामध्ये ३०.० दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत घसरेल. जरी २०२५ हंगामामध्ये इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण ४ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढले. मात्र, साखरेचा साठा माफक प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. म्हणून, १.७ दशलक्ष मेट्रिक टन मर्यादेपलीकडे वळवण्याची परवानगी देण्याच्या धोरणाबाबत स्पष्टता आणि निर्यात हे या क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे. शिवाय, देशांतर्गत साखरेचे दर, जे सध्या ३८-३९ रुपये प्रती किलोच्या श्रेणीत आहेत, ते पुढील हंगामाच्या सुरुवातीपर्यंत स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कारखान्यांच्या नफ्याला आधार मिळेल.

ICRA च्या मते, ३० सप्टेंबरपर्यंत साखरेचा क्लोजिंग साठा सुमारे ९.१ दशलक्ष मेट्रिक टन असेल, जो ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या ५.६ दशलक्ष मेट्रिक टन साखरेच्या साठ्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. हे प्रमाण ३.८ महिन्यांच्या वापराच्या समतुल्य असेल.ICRA च्या अंदाजानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद होणारा शिल्लक साठा चार महिन्यांपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here