आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त केले: योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती उदासिनतेचा आरोप केला. ते म्हणाले की, सपाच्या कार्यकाळात सिंचन आणि वेळेवर ऊस बिले देण्यासह पाणी, तसेच वीजेचा तुटवडा हे मुख्य अडथळे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस पेटवून द्यावा लागत होता. ते म्हणाले की, पूर्वी शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यांनी दावा केला की गेल्या सहा वर्षात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज भासलेली नाही. आम्ही वेळेवर ऊस बिले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि आता शेतकऱ्यांना तोडणी पावतीसाठी इकडे-तिकडे भटकावे लागत नाही. कारण, शेतकऱ्यांना मोबाईलवरच तोडणी पावती उपलब्ध करुन दिली जाते.

सहकारी ऊस आणि साखर कारखाना समित्यांमध्ये स्थापित कृषी मशीनरी बँकांसाठी ७७ ट्रॅक्टर्सना हिरवा झेंडा दाखवताना आदित्यनाथ म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. होळीच्या पूर्वसंध्येला आज डीबीटीच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात येत आहेत. ते म्हणाले की, युपीमध्ये २.६० लाख शेतकरी आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. आम्ही गेल्या साडेतीन वर्षात त्यांच्या खात्यांमध्ये ५१ हजार कोटी रुपयांचा निधी पाठवला आहे. ते म्हणाले की, राज्यातील ११९ कारखान्यांपैकी १०५ कारखान्यांनी १० दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here