ISMA कडून हंगाम २०२४-२५ साठी साखर उत्पादनाचा दुसरा अंदाज जाहीर

नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने साखर हंगाम २०२४-२५ साठी साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. याबाबत जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इस्माने जानेवारी २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात ऊस शेतीचे उपग्रह प्रतिमा मिळवल्या आहेत. उपग्रह प्रतिमांवरून देशभरातील शेतातील आधीच तोडणी झालेले क्षेत्र आणि उरलेल्या क्षेत्राची चांगली कल्पना येते. ISMA च्या म्हणण्यानुसार, तोडणी केलेल्या आणि उर्वरित क्षेत्राच्या छायाचित्रांवर आधारित, क्षेत्र भेटी, ऐतिहासिक ट्रेंड, हवामान, उत्पादनातील सध्याचा कल आणि आतापर्यंत मिळालेला साखर उतारा तसेच साखर हंगामाच्या उर्वरित कालावधीत अपेक्षित उत्पादन/साखर उतारा याविषयी ३१ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या इस्माच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २०२४-२५ हंगामाबाबत चर्चा करण्यात आली.

ISMA ने हंगाम २०२४-२५ साठी साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये सुमारे ३७.५ लाख टन साखर वळवण्याच्या अंदाजानंतर एकूण साखर उत्पादन सुमारे ३१०.२ लाख टन आणि निव्वळ साखर उत्पादन सुमारे २७२.७ लाख टन होईल असा अंदाज आहे. एकूण साखर वळवण्याचे आकडे राज्यनिहाय इथेनॉल पुरवठा वाटप आणि अपेक्षित गाळपाच्या आधारे समायोजित केले आहेत. याबाबत इस्माने म्हटले आहे की, सरकारी आकडेवारीनुसार, २०२४-२५ हंगामाच्या पहिल्या ३ महिन्यांत (ऑक्टोबर-२०२४ ते डिसेंबर-२०२४) देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे ६५ लाख टन आहे, जो गेल्यावर्षीच्या ६९.५ लाख टनांच्या एकत्रित आकड्यापेक्षा जास्त आहे. त्याच कालावधीत, विक्री कोट्यापेक्षा सुमारे ५ लाख टन कमी आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादन आणि साखरेचा उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. मुख्यतः मोठ्या प्रमाणात रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव आणि विविध जातींच्या बदलांमुळे राज्यात ऊस उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनही घटले आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांमध्ये प्रति युनिट क्षेत्रावर उसाचे उत्पादन कमी होत आहे. इस्माच्या मते, नैऋत्य मान्सून/मान्सून नंतरच्या काळात जास्त पावसामुळे शेतांमध्ये ओलावा कायम राहिल्याने अनेक भागात उसाला अकाली तुरे येणे हे याचे मुख्य कारण आहे. संपूर्ण मान्सून हंगामात ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचे तास कमी झाले. २०२४ मध्ये अनुकूल नैऋत्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये २०२५-२६ हंगामासाठी लागवड या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. परिणामी, २०२५-२६ चा गाळप हंगाम ऑक्टोबर २०२५ मध्ये लवकर सुरू होणार आहे, हंगामाच्या अखेरीस अंदाजे ६२.५ लाख टन साठा उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे, जो पुरेशा प्रमाणात असण्याची अपेक्षा आहे.

३१ जानेवारी २०२५ पर्यंतचे साखर उत्पादनाची अपडेट :

दरम्यान, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे १६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच तारखेला सुमारे १८७.१५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तथापि, यावर्षी सुमारे ५०० कारखाने सुरू आहेत, तर गेल्यावर्षी ५२० कारखाने सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here