कर्नाटक : साखर कारखान्यांना १ ऑक्टोबरपासून गाळप करण्याचे निर्देश देण्याचा मंत्र्यांकडे आग्रह

हावेरी : साखर कारखान्यांना एक ऑक्टोबरपासून उसाचे गाळप सुरू करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी राज्य ऊस उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ऊस पीक तोडणीसाठी तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गाळप हंगाम वेळेत सुरु झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राज्य ऊस उत्पादक संघाने म्हटले आहे.

अलिकडेच साखर मंत्री शिवानंद पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीवर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्यांना एक ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखाने सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात अथवा एक ऑक्टोबरला गाळप सुरू करतात. मात्र, यावेळी कारखाने नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य ऊस उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी साखर मंत्री शिवानंद पाटील यांना निवेदन दिले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here