कर्नाटक : म्हैसूरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी

म्हैसूर : कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि राज्य ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (सीएडीए) कार्यालयाबाहेर निदर्शने केली. सिंचनासाठी केआरएस आणि काबिनी जलाशयातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य ऊस उत्पादक संघटनेचे सरचिटणीस हट्टाली देवराजू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी ऊस, भात, सुपारी, नारळ, केळी आणि इतर भाज्यांसह विविध पिकांवर पाण्याच्या कमतरतेचा गंभीर परिणाम अधोरेखित केला.

देवराजू म्हणाले कि,पाण्याअभावी ही पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी आवश्यक असलेल्या टाक्या आणि तलाव भरण्यासाठी काबिनी जलाशय क्षेत्रातील कालव्यांमध्ये त्वरित पाणी सोडण्याची मागणी केली. पाण्याच्या कमतरतेमुळे लोकांना आणि जनावरांना भेडसावणाऱ्या भयानक परिस्थितीकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, भूजल पातळी घसरत आहे. त्यामुळे कृषी पंपांसाठी समस्या निर्माण होत आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांवरही परिणाम होत आहे. निदर्शकांनी सीएडीए कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखले तेव्हा परिस्थिती तणावपूर्ण झाली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली, परंतु तरीही शेतकरी पाणी सोडण्याच्या त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here