केनिया : ऊस दराबाबत शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका कायम

नैरोबी : केनियाचे शेतकरी जादा ऊस दराच्या मागणीवर ठाम आहेत. साखर कारखानदारांनी शुक्रवारपासून कामकाज बंद करण्याचा इशारा देऊनही कारखानदारांशी तडजोड करण्यास तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारखानदार न्यायालयाच्या त्या निर्णयाचा विरोध करीत आहेत, ज्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना प्रती टन ८०० रुपये जादा देण्यास सांगण्यात आले आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी ऊस दर नियंत्रण समितीने हा दर निश्चित केला आहे.

तथापि, केनिया असोसिएशन ऑफ शुगर अँड अलाईड प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष चार्ल्स अत्यांग म्हणाले की, कारखानदारांनी शेतकऱ्यांना ठरल्यानुसार पैसे द्यावेत, अन्यथा कारखाने बंद ठेवावे, या त्यांच्या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५९०० रुपये प्रती टन द्यायचे नसतील, तर त्यांनी आज संध्याकाळपासून कारखाने बंद करावेत, असे आवाहन मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करतो असे आत्यांग म्हणाले. शेतकऱ्यांच्या हक्कांचा आणि भूमिकेचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, केनिया शुगरकेन ग्रोअर्स असोसिएशनचे सरचिटणीस रिचर्ड ओगेंडो म्हणाले की, ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी वाजवी आणि पारदर्शक किंमत मिळण्याचा अधिकार आहे. कारखानदार धमकावण्याचा प्रयत्न करून आर्थिक दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी कमी दर देण्यासाठी साखरेच्या एकूण किमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्राधिकरण (AFA) सर्व संबंधित घटकांच्या फायद्यासाठी योग्य किंमत ठरवू शकेल. यासाठी कारखानदारांनीही आपल्या उत्पादन खर्च मांडावा.

ओगेंडो म्हणाले, ते काय बोलत आहेत हे आपण कसे शोधू शकतो? कारखानदारांनी केनिया शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून ६ मे २०२४ रोजी एएफए, कृषी मंत्रालय, ट्रेझरी, केनिया युनियन ऑफ शुगर प्लांटेशन अँड अलाईड वर्कर्स आणि केनिया नॅशनल फेडरेशनला तसेच शेतकऱ्यांना विरोधाचे पत्र दिले आहे.

संघटनेने अध्यक्ष जयंतीलाल पटेल यांच्या माध्यमातून असोसिएशनने सांगितले की, ऊस दराबाबत न्यायालयाच्या निर्देशाने, त्यांच्या हक्कांचे आणि व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ३०,००० नोकऱ्यांचे नुकसान होईल आणि साखर उत्पादनात घट होईल. मासिक महसुलात २ बिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसान होईल. इतर परिणाम पाहता ४,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नुकसान होईल, जे कारखान्यांना दरमहा ७,२०,००० टन ऊस पुरवठा करतात, ज्याचे मूल्य ३.६ अब्ज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here