कोरोनामुळे ऊस गाळप मंदावण्याची शक्यता

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे भारतात ऊस तोडीमध्ये विलंब होवू शकतो, कारण ऊस तोडीसाठी आवश्यक लाखो प्रवासी मजूर कोरोना मुळे प्रवास करु शकत नाहीत. भारतात ऊसाची तोडणी ऑक्टोबरमध्ये सुरु होते. देशातील साखर उद्योग आताही पूर्ण पणे यांत्रिकीकृत नाही. ऊस तोडीसाठी आताही साखर कारखाने प्रवासी मजुरांवर अवलंबून आहेत. आता साखर कारखान्यांना याचा धोका वाटत आहे की, कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे ऊसतोडणी मजुरांनी ऊसतोडीपासून तोंड फिरवू नये. गाळपामध्ये उशिर झाल्यामुळे भारतीय कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन मंदावण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी सांगितले की, कित्येक गोष्टी यावर अवलंबून आहेत की, स्थानिक स्तरावर किती काम उपलब्ध आहे आणि आक्टोबर मद्ये कोरोनाचा फैलाव कितपत होवू शकतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here