महाराष्ट्र : ऊसतोड़ मजूरांच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात आतापर्यंत 884.46 लाख टन उसाचे गाळप करून 88.45 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात याचवेळी 953.06 लाख टन उसाचे गाळप आणि 94.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ऊस तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. उसतोडीला होणाऱ्या विलंबाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक साखर कारखान्यांनी केन कटर तैनात केली आहेत. तथापि, हे केन कटर लहान शेती क्षेत्रासाठी योग्य नाहीत. ज्यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकरी पारंपरिक ऊस तोडणीवर अवलंबून आहेत.

महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीवरून, या हंगामात केवळ आठ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे, तर मागील वर्षी याच वेळी ४५ कारखान्यांनी गाळप थांबवले होते. वाढलेल्या हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या कमतरतेला जबाबदार धरले जात आहे. अनेक शेतकरी लवकरात लवकर गाळप व्हावे म्हणून ऊस जाळत आहेत, कारण साखर कारखानदार जळालेल्या उसाचे गाळप प्राधान्याने करतात.

या हंगामात कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात अनुक्रमे 11.36 टक्के आणि 10.28 टक्के सर्वाधिक रिकवरी पाहायला मिळत आहे. याउलट, नागपूर विभागात ५.४७ टक्क्यांपेक्षा कमी रिकवरी पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील साखर कारखान्यांनी रिकवरी ८.६६ टक्क्यांपेक्षा कमी आहे.कोल्हापुरात चाळीस कारखान्यांनी राज्यात सर्वाधिक एकूण 204.71 लाख टन उसाचे गाळप केले आहे. तर नागपुरात चार खासगी कारखान्यांनी सर्वात कमी 2.76 लाख टन उसाचे गाळप केले आहे. छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथील पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here