महाराष्ट्रातील गळीत हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २१ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात १४९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७४ सहकारी तसेच ७५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १४९.४२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १३२.७६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.८९ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ३५ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सोलापूर विभागात ३३.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर २७.३५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा ८.१४ टक्के आहे.