महाराष्ट्र : नागपूर विभागात साखर उतारा सर्वात कमी

नागपूर : महाराष्ट्राने साखर उताऱ्याबाबत चांगली कामगिरी केली आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात असून सर्वात कमी साखर उतारा नागपूर विभागात आहे.

नागपूर विभागात या हंगामात साखर कारखाने कमी संख्येने कार्यरत होते. महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार, १४ मार्च २०२२ पर्यंत नागपूर विभागात ४ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यापैकी एक साखर कारखाना आता बंद झाला आहे. येथील चारही साखर कारखाने खासगी आहेत. येथे ३.३९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आणि ८.५६ टक्के साखर उतारा नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात साखर उतारा १०.३४ टक्के आहे. तर गेल्या हंगाात १४ जानेवारी २०२१ पर्यंत साखर उतारा १०.३९ टक्के होता. कोल्हापूरमध्ये साखर उतारा सर्वाधिक ११.७३ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here