नाशिक : महाराष्ट्र आता साखर उत्पादनात देशात अग्रेसर राज्य बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकमध्ये साखर कारखान्याच्या गाळप समारंभात बोलताना मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्र साखर उत्पादन आणि निर्यात या दोन्ही बाबींमध्ये देशात मोठे योगदान देत आहे. देशात सर्वाधिक एफआरपी दिल्याबद्दल त्यांनी कारखान्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या नाशिक साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. देशात सर्वाधिक ४२,६०० कोटी रुपयांची योग्य आणि लाभदायी बिले (एफआरपी) दिल्याबद्दल त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांचे कौतुक केले. सहकार क्षेत्राची सध्याची स्थिती पाहता, आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास समितीही स्थापन करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.