मलेशियाने भारताकडे साखर निर्यातीवरील बंदी उठवण्याची केली विनंती

क्वालालंपूर: मलेशियाने भारताला साखरेवरील निर्यात बंदी उठवण्याची विनंती केली आहे. मलेशियाचे बागायती आणि कमोडिटी मंत्री जोहरी अब्दुल घनी म्हणाले की, मलेशियाने भारताला तांदूळ आणि साखरेवरील निर्यात बंदी उठवण्याची विनंती केली आहे. घटलेले उत्पादन आणि वाढत्या किमतींमुळे भारताने साखर निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. नवी दिल्लीतील एका उद्योग परिषदेत बोलताना जोहरी अब्दुल घनी यांनी भारताने कृषी उत्पादनांवर अचानक लादलेली निर्यात बंदी मलेशियासाठी नकारात्मक आहे, अशी टिप्पणी केली. भारत मलेशियाचा साखर, तांदूळ आणि कांद्याचा महत्त्वाचा पुरवठादार आहे.

‘इस्मा’ने ही केंद्र सरकारकडे साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. ‘इस्मा’ने अतिरिक्त साखर साठा राहील,असा अंदाज वर्तवला आहे. ’इस्मा’च्या मते,ऑक्टोबर २०२३ मध्ये सुमारे ५६ लाख टनांचा प्रारंभिक साठा आणि हंगामासाठी अंदाजे २८५ लाख टन घरगुती वापरासह सप्टेंबर २०२४च्या अखेरीस ९१ लाख टनांचा क्लोजिंग साठा असेल. हा अंदाजे ५५ लाख टनांच्या अनुमानीत साठ्यापेक्षा ३६ लाख टन अधिक असेल. या अतिरिक्त साठवणूक आणि वहन खर्चामुळे साखर कारखान्यांवर खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू शकतो, असा दावा ISMA ने केला आहे. साखर निर्यातीला परवानगी दिल्याने कारखान्यांची आर्थिक तरलता वाढेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले देणे सुलभ होईल, असे ‘इस्मा’ने म्हटले आहे.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here