मांजरा साखर कारखान्यातर्फे २० दिवसांत १ लाख टन गाळप

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम केवळ २० दिवसात एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. कारखान्याकडून २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत १०३७१० मेट्रिक टन गाळप झाले आहे. तसेच ५१०५००० (केडबल्यूएच) एवढी वीज निर्मिती केली आहे. यासोबतच डिस्टलरी प्रकल्पातून ७७०४०१ एवढे अल्कोहोल निर्मिती केली आहे. इथेनॉल प्रकल्पातून २५६११८ लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे.

गळीत हंगाम २०२३- २४ साठी गाळप क्षमतेचा विस्तार करून शेतक-यांचा ऊस वेळेत गाळपासाठी कारखान्याकडे यावा यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा कार्यरत आहे. साखर व अन्य उपपदार्थ निर्मितीमधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न सुरू असून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याकडे आपला ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here