जादा तीन लाख क्विंटल ऊस गाळप करून कारखाना बंद

आंबेडकरनगर : आपल्या उद्दीष्टापेक्षा तीन लाख क्विंटल अधिक ऊसाचे गाळप करून भोर येथील अकबरपूर साखर कारखाना, मिझोडाचा गळीत हंगाम समाप्त झाला. सरकारने कारखान्याला ८५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट दिले होते. कारखान्याने ८७ लाख ८५ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. यासोबतच १९ मार्चपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिली आहेत. उर्वरीत बिले देण्याची प्रक्रियाही गतीमान करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर टक्के ऊस बिले दिली जातील असे सूत्रांनी सांगितले.

अकबरपूर साखर कारखान्याच्या गाळपास २४ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. कारखान्याने ३४ ऊस खरेदी केंद्रे स्थापन केली होती. ऊस खरेदीतील अडथळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेमुळे दूर झाले होते. आधी कारखान्याला ८६ लाख क्विंटलचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र, नंतर घटवून हे उद्दीष्ट ८४ लाख क्विंटलवर आणण्यात आले. कारखान्याने बुधवारी २ लाख ८५ हजार क्विंटल जादा ऊसाचे गाळप करून हंगाम समाप्ती केली. सहाय्यक महा व्यवस्थापक अरविंद सिंह म्हणाले, की, १९ मार्चपर्यंत ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के बिले दिली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here