मान्सूनच्या काळात ऊस लागवड केल्यास अधिक उत्पादन : डॉ. अनुप कुमार

सितापूर : दि सेकसरिया साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीचा प्रारंभ ऊस महाव्यवस्थापक डॉ. अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी की, मान्सूनच्या काळात ऊसाची लागवड करून शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन मिळविण्याची संधी साधावी असे आवाहन केले. ते म्हणाले की, सध्याच्या तुलनेत शेतकरी दीड पट अधिक ऊस उत्पादन मिळवू शकतात. पावसाच्या काळात ऊस लागवड ही कल्पना वेगळी आहे. मात्र, त्यापासून अधिक लाभ मिळतो हे वास्तव आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पूर्वहंगामी आणि हंगामी ऊस लागवडीबरोबरच आता मान्सूनच्या काळात, आडसाली ऊस लागवडही केली जात आहे. याची सुरुवात बिसवामधील सेकसरिया साखर कारखान्याने केली आहे. यापूर्वी शेतकरी हिवाळा आणि ऊन्हाळ्यात ऊस लागवड करीत होते. पावसाळ्यात ते ऊसाचे पाणी वाचवणे, कीड व रोगांपासून त्याचा बचाव याची काळजी करत होते. मात्र, आता आधुनिक काळात नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ऊसाच्या अधिक लागवडीसाठी आडसाली ऊस हंगामाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आहे. मान्सून काळात ऊस लागवडीचे पहिले पाऊस सेकसरीया कारखान्याने उचलले आहे. महमूदपूर गावातील शेतकरी प्रमोद कुमार वर्गा यांच्या शेतामध्ये पूजा-अर्चा करून कोसी १५०२३ या प्रजातीच्या उसासोबत या लागवडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी ऊस व्यवस्थापक अविनाश चंद्र यांसह कारखाना कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here