मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील ऊस सर्व्हे पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र तीन टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. १५ एप्रिल ते १५ जून या काळात सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. ऊस विभागाचे ९० पर्यवेक्षक आणि साखर कारखान्यांचे २७३ पर्यवेक्षक या कामात सहभागी झाले होते. दोन महिने सुरू राहिलेल्या या सर्व्हेचा अहवाल तीन दिवसांनंतर दिला जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के जमिनीवर शेती केली जात आहे. यंदा सर्व्हेत लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह म्हणाले की, सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात हा सर्व्हे झाला आहे. सर्वेक्षणादरम्यान ऊस विभाग आणि साखर कारखाना अशा दोन्हीकडील पर्यवेक्षक उपस्थित होते. जिल्ह्यात विभागातील ९० आणि साखर कारखान्यांचे २७३ पर्यवेक्षक कार्यरत होते. दोन महिन्यामध्ये सर्व्हे पूर्ण झाला आहे. आगामी तीन दिवसांत याचा अहवाल सादर होईल अशी अपेक्षा आहे.