पंजाब: खरेदीदार न मिळाल्याने शेतकऱ्याने ऊस पिकाला लावली आग

फरीदकोट, पंजाब: फरीदकोट च्या सादिक गांवातील एका शेतकऱ्याने मंगळवारी आपल्या 3 लाख रुपयापेक्षा अधिक किमत असणाऱ्या उभ्या ऊस पिकाला जाळले. क्षेत्रात साखर कारखाना नसल्याने जगतार सिंह ऊसाचा रस विकणाऱ्याना ऊस विकत होते. पण गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडॉऊन मुळे त्यांच्या जवळ कोणी खरेदीदार नव्हता. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या पिकाला आग लावली. गेल्या चार वर्षापासून, जगतार सिंह आणि क्षेत्रातील अन्य शेतकरी आपला ऊस रस विक्रेत्यांना विकत होते, ज्यामुळे त्यांना वार्षिक प्रति एकर 2 लाख रुपयांपर्यंत फायदा होत होता.

जगतार म्हणाले, माझे पीक वाळत होते. जेव्हा याला विकण्याचे सर्व पर्याय बंद झाले तेव्हा मी पिकाला आग लावली. या क्षेत्रात अन्य शेतकरी ही आहेत जे केवळ विक्रेत्यांसाठी ऊस पिकवतात आणि उन्हाळ्यात विकतात. पण यावेळी लॉक डाऊन सह हंगाम खुला झाला, ज्यामुळे ऊस विक्रीच्या साऱ्या शक्यता संपून गेल्या होत्या.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here