ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरलेल्या साखर कारखान्यांना पाठवली नोटीस

पुणे : चीनी मंडी

कोरोना संकटामुळे साखर कारखान्यांसह ऊस शेतकर्‍यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. कारखान्यांची साखर विकली जात नाही, ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळत नाही आणि ते ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले आहेत. तिथेच ऊस शेतकर्‍यांसमोरही आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाने शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे भागवण्यात अपयशी ठरल्यामुळे राज्यातील 15 साखर कारखन्यांना नोंटीस पाठवली आहे. ऊस नियंत्रण अधिनियमा अनुसार, ऊस गाळपानंतर 14 दिवसांच्या आत कारखान्यांकडून शेतकर्‍यांना ऊसाचे बिल भागवणे अपरिहार्य आहे. पण अनेक साखर कारखाने यामध्ये अयशस्वी ठरले आहेत.

काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. तसेच कोरोनामुळे साखर निर्यात ठप्प झाली आहे आणि घरगुती बाजारात साखर विक्री देखील पूर्णपणे मंदावली आहे. साखर कारखानेदेखील सरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत की, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी पॅकेजची घोषणा केली जावी. महाराष्ट्रात साखर कारखान्यांना या हंगामात पूर आणि दुष्काळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here