ऊस बिले देण्यास उशीर करणाऱ्या दोन साखर कारखान्यांना नोटीस

पडरौना : शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले देण्यास विलंब केल्याबद्दल ऊस विभागाने जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. एका आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. कप्तानगंज साखर कारखान्याने शेतकऱ्यांना आथधीचे १७ कोटी रुपये तसेच नवे ४१ कोटी रुपये थकवले आहेत. तर सेवरही साखर कारखान्याकडे ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कप्तानगंज साखर कारखान्याने नव्या हंगामात काहीच बिले दिलेली नाहीत. तर सेवरही कारखान्याने ३२ टक्के ऊस बिले दिली आहेत. शेतकऱ्यांना नव्या सत्रात जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडे दीड अब्ज रुपयांच्या ऊस बिलांची थकबाकी आहे.

लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कुशीनगरमध्ये पाच कारखाने सुरू आहेत. रामकोला पंजाब साखर कारखान्याने १५ नोव्हेंबर तर इतर कारखान्यांनी डिसेंबरच्या पहिल्या हंगामात गाळपाला सुरुवात केली. आतापर्यंत कारखान्यांनी १३५.५१ लाख क्विंटल ऊस गाळप केला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना एकूण ४ अब्ज ६९ कोटी ९४ लाख ७४ हजार रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. यामध्ये १४ दिवसांत शेतकऱ्यांना ३ अब्ज ६३ कोटी ७८ लाख २७ हजार रुपये द्यायचे आहेत. यापैकी २ अब्ज ९९ कोटी २ लाख ४ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांचे १४ दिवसांतील ६४ कोटी ७७ लाख २३ हजार रुपयांची थकबाकी आहे. या पाच कारखान्यांपैकी कप्तानगंज साखर कारखान्याची थकबाकी सर्वाधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here