२०२८ पर्यंत अतिश्रीमंत भारतीयांची संख्या ९४,००० पर्यंत वाढण्याची शक्यता : अहवाल

नवी दिल्ली : जागतिक सल्लागार कंपनी नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, २०२८ पर्यंत अतिश्रीमंत भारतीयांच्या संखेत ९.४ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. अतिश्रीमंत व्यक्ती म्हणजे १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या व्यक्ती. नाईट फ्रँकच्या प्रमुख कंपनी, द वेल्थ रिपोर्ट २०२५ मध्ये २०२४ मध्ये अतिश्रीमंत भारतीयांची संख्या ८५,६९८ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, जो २०२८ पर्यंत वाढून ९३,७५३ पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या मते, ही वाढ देशाची मजबूत दीर्घकालीन आर्थिक वाढ, वाढती गुंतवणूक संधी आणि विकसित होत असलेली लक्झरी बाजारपेठ अधोरेखित करते.

२०२४ मध्ये, भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या वर्षानुवर्षे ६ टक्क्यांनी वाढून ८५,६९८ झाली, जी २०२३ मध्ये ८०,६८६ होती. अहवालानुसार, जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी ३.७ टक्के श्रीमंत भारतीय आहेत आणि सध्या अमेरिका (९,०५,४१३ अतिश्रीमंत व्यक्ती), चीन (४,७१,६३४ अतिश्रीमंत व्यक्ती) आणि जपान (१,२२,११९ अतिश्रीमंत व्यक्ती) नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.जागतिक स्तरावर अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या २०२४ मध्ये ४.४ टक्क्यांनी वाढून २३,४१,३७८ झाली, जी गेल्या वर्षी २२,४३,३०० होती.

या वर्षी उत्तर अमेरिका संख्येत आघाडीवर असताना, जगातील सर्व प्रदेशांमध्ये वाढ नोंदवली गेली. आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ५ टक्के वाढ झाली. त्यानंतर आफ्रिका ४.७ टक्के, ऑस्ट्रेलिया ३.९ टक्के, मध्य पूर्व २.७ टक्के, लॅटिन अमेरिका १.५ टक्के आणि युरोप १.४ टक्के आहे. अमेरिकेत जवळपास ३९ टक्के अतिश्रीमंत लोक राहतात, जे चीनपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत. भारतात आता १९१ अब्जाधीश आहेत, त्यापैकी २६ जण गेल्या वर्षीच या यादीत सामील झाले आहेत, जे २०१९ मध्ये फक्त ७ होते.

भारतीय अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ९५० अब्ज डॉलर्स इतकी आहे, जी अमेरिका (५.७ ट्रिलियन डॉलर्स) आणि चीन (१.३४ ट्रिलियन डॉलर्स) नंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, भारताची वाढती संपत्ती त्याच्या आर्थिक लवचिकता आणि दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेवर प्रकाश टाकते. उद्योजकीय गतिमानता, जागतिक एकात्मता आणि उदयोन्मुख उद्योगांमुळे देशात उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये अभूतपूर्व वाढ होत आहे.पुढील दशकात, जागतिक संपत्ती निर्मितीमध्ये भारताचा प्रभाव अधिक मजबूत होईल,” असे बैजल पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here