महाराष्ट्र मध्ये गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, १० साखर कारखाने अजूनही सुरु

कोल्हापूर : देशभरातील अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. कर्नाटकात सर्व 63 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. दोन प्रमुख ऊस उत्पादक राज्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्रत अजूनही कारखाने सुरु आहेत.

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ISMA च्या म्हणण्यानुसार, 136 कारखान्यांनी यापूर्वीच आपले गाळप बंद केले आहे आणि राज्यात 15 एप्रिल पर्यंत केवळ 10 कारखाने चालू आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत 15 एप्रिल पर्यंत कारखान्यांनी 60.12 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, गेल्या वर्षी याच अवधीत 106.71 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. एकूण 146 साखर कारखान्यांमध्ये 67 खाजगी साखर कारखाने आणि 79 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 2019-20 या गाळप हंगामात भाग घेतला होता.

ज्या ठिकाणी ऊसाची उपलब्धता आहे, त्या क्षेत्रातील कारखाने सुरु आहेत. ISMA नुसार, या हंगामात 15 एप्रिल पर्यंत ऊसाचे उत्पादन 247.80 लाख टन इतके झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात साखर उत्पादन 311.75 लाख टन इतके होते. या हंगामात 15 एप्रिल पर्यंत 139 साखर कारखाने ऊस गाळप करत होते. तेच गेल्या वर्षी याच काळात 172 साखर कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here