थकीत ऊस बिल प्रश्न भाकियूचे साखर कारखान्यासमोर आंदोलन

सहारनपूर : थकीत ऊस बिले आणि इतर मागण्यांसाठी भाकियूच्या तोमर गटाच्या कार्यकर्त्यांनी गांगनौली येथील बजाज साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. २० फेब्रुवारीपर्यंतची थकीत ऊस बिले २४ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. भाकियूचे प्रदेश अध्यक्ष सुदेश पाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पिकाचे पैसे वसूल करण्यासाठी आंदोलन करावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभाग अध्यक्ष विरेंद्र सिंह यांनी सांगितले की, साखर कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर करत आहे. त्यामुळे कोंडी झाली आहे. जिल्हाध्यक्ष अभिषेक कांबोज यांनी नवा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्याने रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली. दोन तासांच्या आंदोलनानंतर युनिट हेड हरवेश मलिक, ऊस व्यवस्थापक ए. के. चौहान, अखिल राठी, महेश शर्मा यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. थकीत बिले २४ ऑक्टोबरपर्यंत ऊस समित्यांकडे पाठविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सत्यपाल सिंह, नारायण सिंह, जितेंद्र सिंह, सगीर, अक्रम, मधुसूदन, चंद्रपाल, आशिष चौधरी, वाजिद, मोना सैनी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here