परभणी : केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडली सोयाबीन पिक विम्याची समस्या

परभणी : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. संवादादरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन पिकाच्या प्रलंबित विम्याची समस्या केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडली. याबाबत चौहान यांनी कृषी व शेतकरी कल्याण अधिकाऱ्यांना तातडीने हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने या संदर्भात, २२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची (TAC) बैठक घेतली. बैठकीत पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने नोंदवलेला आक्षेप फेटाळण्यात आले. या निर्णयामुळे विमा कंपनीला परभणी जिल्ह्यातील सुमारे २,००,००० शेतकऱ्यांचे २०० ते २२५ कोटी रुपयांचे प्रलंबित दावे अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने २४ ऑगस्ट रोजी, संबंधित विमा कंपनीला एका आठवड्याच्या आत देय दाव्याची रक्कम देण्याचे आदेश जारी केले आहेत.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here