नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योग मजबूत आणि सशक्त करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राकडून मी सहकार मंत्री अमित शहा यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण, त्यांनी साखर उद्योगाला खूप गांभीर्याने घेतले आहे. शहा यांनी सांगितले की, मार्जिन मनी, खेळते भांडवल, कर्जाचे पुनर्गठन यासोबतच प्राथमिक कृषी सोसायट्यांचे बळकटीकरण व्हायला हवे. मुख्यमंत्री म्हणाले की, या निर्णयाचा महाराष्ट्रातील साखर उद्योगाला फायदा होईल, अशी आशा आहे.