कंडेरा गावामध्ये शेतकर्‍यांना सरकारी रेटवर प्रति महिना एक क्विंटल साखर देण्याचे वचन

बागपत: कंडेरा गावामध्ये बुधवारी आयोजित शेतकर्‍यांच्या बैठकीमध्ये सहकारी साखर कारखाना रमाला चे मुख्य व्यवस्थापक यांनी सर्व शेतकर्‍यांना सरकारी रेटवर प्रति महिना एक क्विंटल साखर देण्याचे वचन दिले.

शेतकरी अनेक दिवसांपासून कारखान्यांकडून स्वस्त साखरेची मागणी करत होते. बुधवारी कंडेरा गावामध्ये अभिषेक तोमर यांच्या घरी झालेल्या बैठक़ीत मुख्य व्यवस्थापक डॉक्टर आरबी राम यांनी शेतकर्‍यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांचे निवारण केले. त्यांनी शेतकर्‍यांना म्हटले की, कोणत्याही शेतकर्‍याला कोणतीही अडचण होवू दिली जाणार नाही. आगामी गाळप हंगामात कंडेरा गावामध्ये आठ एकर मध्ये एक मोठे खरेदी केंद्र स्थापित केले जाईल, ज्यामध्ये शेतकरी 24 तास ऊसाचे वजन करु शकतील. शेतकर्‍यांच्या मागणीवर त्यांना सरकारी रेट वर प्रति महिना एक क्विंटल साखर देण्याचे वचन केले. ते म्हणाले, गरजू शेतकरी सुपरवाइजर यांना भेटून साखर बुक करु शकतात. यावेळी सौराज सिंह, मास्टर वीरसेन सिंह, बिजेंद्र, जसवीर आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here