राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी फॅक्टरी मॅनेजर विजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ दिली. सचिव डी. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली म्हणाले की, कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विना अपघाताची परंपरा निर्माण केली आहे. ही परंपरा आपण कायम ठेवावी.

कामगार संचालक मनोहर सन्मुख, विकास पवार, कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जनरल मॅनेजर (उत्पादन ) सुनील सावंत, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, पर्यावरण अधिकारी राजेंद्र पाटील, धैर्यशील पाटील, भोपाल पवार, सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड, आर. एल. बोराळकर, उत्तम पाटील, संभाजी खोत, संजय गुरव, अक्षय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here