30 नोव्हेंबर पर्यंत उस थकबाकी भागवण्याचे आश्‍वासन, धरणे आंदोलन संपले

बिजनौर: धामपुर साखर कारखाना धामपूर च्या मुख्य गेटवर चालू असणार्‍या भारतीय किसान यूनियन लोकशक्ती अराजनैतिक चे धरणे आंदोलन बुधवारी संध्याकाळी संपवण्यात आले. संघटनेने कारखाना प्रशासनाकडून आश्‍वासन मिळाले की, 30 नोव्हेंबर पर्यंत गेल्या वर्षाची संपूर्ण उस थकबाकी दिली जाईल.

धामपूर साखर कारखाना धामपुर च्या मुख्य गेटवर भाकियू यूनियन लोकशक्ती अराजनैतिक यांनी मंगळवारी धरणे आंदोलन सुरु केले होते. शेतकरी संघटनेची मागणी होती की, साखर कारखान्याला शेतकर्‍यांना गेल्या वर्षीची संपुर्ण उस थकबाकी द्यावी लागेल. याशिवाय उसाची पावती मैसेज वर पाठवण्याच्या ऐवजी मैन्यूली पाठवावी लागेल. याशिवाय अनेक मागण्यांबाबत ही संघटनेतील कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. दूसरीकडे कारखाना प्रशासनाकडून कारखाना व्यवस्थापक विजय गुप्ता यांनी सांगितले होते की, संघटनेच्या मागणीशिवाय कारखाना यापूर्वी याच समस्यांवर विचार करत आहे.

याशिवाय कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की, जर लवकर संघटनेने कारखाना गेटवरचे धरणे आंदोलन संपवले नाही तर कडक कारवाई केली जाईल. बुधवारी संघटनेच्या तहसील अध्यक्ष जीतेंद्र कुमार यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने सीओ धामपूर अजय कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत आश्‍वासन दिले आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांची संपूर्ण उस थकबाकी भागवली जाईल. या आश्‍वासनावर धरणे आंदोलन संपवले जात आहे. त्यांनी हेदेखील सांगितले की, जर कारखाना आपल्या अश्‍वासनावरुन हटले तर ते 30 नोव्हेंबर नंतर पुन्हा आंदोलन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here