पिलिभित : तांत्रिक बिघाडामुळे सकाळी नऊ वाजता पुरनपूर साखर कारखाना बंद पडला. त्यामुळे ऊसाचे वजन करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. कारखाना कधी सुरू होणार याची प्रतीक्षा दिवसभर ऊस घेवून आलेल्या शेतकऱ्यांना होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारखाना सुरू होवू शकला नाही.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सकाळी नऊच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे कारखाना बंद पडला. याची माहिती मिळताच कारखान्याच्या गेटवर ऊसाचे वजन करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. साठा कमी राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रयत्न करूनही कारखाना सुरू होवू शकला नव्हता. कारखान्यात वारंवार बिघाड होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शुक्रवारी कारखाना अनेक तास बंद पडला होता. कारखान्याचे सरव्यवस्थापक रमाकांत वर्मा यांनी सांगितले की यातील बिघाड दूर करण्यात यश आले आहे. लवकरच कामकाज पूर्ववत होईल.