मुंबईला उकाड्यापासून दिलासा, आता विदर्भाला तडाखा

मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. यादरम्यान, मुंबईला उकाड्यापासून दिलासा मिळू लागला आहे. मात्र, विदर्भातील काही भागात याचा प्रभाव अद्याप कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसह अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहील. १९ मार्चनतर तापमान कमी झाल्यानंतर या लाटेचा प्रभाव कमी होईल. दुसरीकडे राज्यातील तापमान अद्याप वाढलेले आहे.

याबाबत एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अकोल्यात बुधवारी सर्वाधिक ४२.९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आगामी काही दिवसांत हवामान कोरडे राहील. गरम वारेही वाहील. महाराष्ट्रातील वायु गुणवत्ता निर्देशांक बहूतांश शहरांत मध्यम आणि समाधानकारक स्थितीत आहे. मुंबईत कमाल ३७ तर किमान २४ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान साफ असे. तर पुण्यात कमाल तापमान ३९ आणि किमान तापमान १९ डिग्री सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये किमान ४१ आणि कमाल २१ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. नाशिक, औरंगाबाद येथेही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here