महाराष्ट्रात साखर उत्पादनाची गती वाढली आहे. राज्यात आतापर्यंत ११५ लाख टनावर साखर उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्रातील साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २७ मार्च २०२२ पर्यंत राज्यात २५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सध्या कोल्हापूर विभागातील १९, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील प्रत्येकी एक आणि सोलापूर विभागातील चार कारखाने बंद झाले आहेत.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २७ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १९७ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११२०.०४ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ११६२.७४ लाख क्विंटल (११६ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३८ टक्के आहे.