हंगाम २०२२-२३ : उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ७५.४३ टक्के ऊस बिले अदा

उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम २०२२-२३ आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि साखर उत्पादन १०५ लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, ऊस बिलांबाबत सरकारच्या प्रयत्नांनी साखर कारखाने वेळेवर बिले देण्याचा प्रयत्न करण्यात मग्न आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, ३ मे २०२३ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी १,०६२.४३ लाख टन उसाचे गाळप करुन १०२.३८ लाख टन साखरेचे उत्पादन केले. तर बिले देण्याच्या बाबत आतापर्यंत २६,५०१.२९ कोटी रुपये म्हणजे ७५.४३ टक्के बिले देण्यात आली आहेत. गेल्या हंगामात राज्यात १०१६.२६ लाख टन ऊस गाळप करुन १०१.९८ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते.

सद्यस्थितीत गळीत हंगाम २०२१-२२ मधील ३५,१११.०६ कोटी, हंगाम २०२०-२१ ध्ये ३३,००७.९५ कोटी, गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ३५,८९८.८५ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ३३,०४८.०६ कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये ३५,४४४.०६ कोटी रुपये बिले देण्यासह गेल्या गळीत हंगामातील १०,६६६.६९ कोटी रुपये आणि आतापर्यंत एकूण २,०९,६७७.९६ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here