महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम समाप्त

पुणे : महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम समाप्त झाला आणि सर्व साखर कारखान्यांनी गाळप समाप्त केले आहे. ऊसाच्या कमतरतेमुळे २०२२-२३ मध्ये साखर उत्पादन जवळपास २२ लाख टनांनी घसरले आहे.

साखर आयुक्त कार्यालयाकडील नव्या अहवालानुसार, चालू हंगामात २१० साखर कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग घेतला होता. त्यांनी ९.९८ टक्के सरासरी साखर उताऱ्यानुसार, १,०५४.७५ लाख टन ऊस गाळप करुन १०५.२७ लाख टन साखर (२०२१-२२ मधील १२७.५३ लाख टनाच्या तुलनेत) उत्पादन झाले आहे.

गेल्या हंगामात १९९ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला होता आणि गळीत हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहिले होते. २०२२-२३ या हंगामात महाराष्ट्रात साखरेचा उताराही ०.४४ टक्क्यांनी घसरला आहे. साखर उत्पादनाबाबत, कोल्हापूर विभाग २३.५४ लाख टन साखर उत्पादन करुन आघाडीवर आहे. तर नागपूर क्षेत्रात कमीत कमी ३.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन करुन अंतिम स्थानावर आहे. या अहवालानुसार, साखर उत्पादनात घसरणीचे मुख्य कारण, गेल्यावर्षी सप्टेंबर-डिसेंबर या कालावधीत झालेला अकवाळी पाऊस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here