गाळप हंगाम 2023-24 : महाराष्ट्रात आतापर्यंत 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पुणे : साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 च्या हंगामात महाराष्ट्रात 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 172 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये 84 सहकारी आणि 88 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून 161.86 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या राज्यात साखरेचा सरासरी उतारा 7.83 टक्के आहे. गेल्या हंगामात याचवेळी 188 साखर कारखाने कार्यरत होते आणि त्यांनी 226.11 लाख टन उसाचे गाळप करून 196.47 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.

सोलापूर विभागात महाराष्ट्रात सर्वाधिक 42 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत सोलापूर विभागात सध्या 37.07 लाख टन उसाचे गाळप करून 26.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथे साखर रिकव्हरी 7.25 टक्के आहे. नागपूर विभागात आतापर्यंत एकाही साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केलेला नाही. अमरावती विभागात सर्वात कमी 2 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here