हंगाम २०२३-२४ : महाराष्ट्रात आतापर्यंत २० साखर कारखाने झाले बंद

पुणे : महाराष्ट्रात चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत केवळ २० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात ४ मार्चअखेर ६५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. या हंगामात साखरेच्या उताऱ्यात किंचित वाढ दिसून येत आहे.

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ च्या हंगामात ४ मार्च २०२४ पर्यंत राज्यातील साखरेचा उतारा १०.०७ टक्के होता. तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर उतारा ९.९३ टक्के होता.

कोल्हापूर विभागातील दोन साखर कारखाने, सोलापूर विभागातील सात, पुणे विभागातील तीन, अहमदनगर विभागातील एक, छत्रपती संभाजी नगर विभागातील सहा आणि नांदेड विभागातील एका साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे.

या हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. त्यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून ९३२.५७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ९३९.१४ लाख क्विंटल (९३.९१ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे.

गेल्या हंगामात २११ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि ९८७.९ लाख टन उसाचे गाळप करून ९८०.६७ लाख क्विंटल (९८.०६ लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here