कर्मवीर साखर कारखान्याकडून १०० रुपयांचा दुसरा हप्ता जमा : चेअरमन, आमदार आशुतोष काळे

अहिल्यानगर :येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी १०० रुपये प्र.मे.टन याप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे.कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेहमीच हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.हीच परंपरा संचालक मंडळाने सुरू ठेवली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन, आमदार आशुतोष काळे यांनी केले.

चेअरमन काळे म्हणाले की, साखर कारखान्याचे दोन टप्प्यांत आधुनिकीकरण व विस्तारीकरण पूर्ण करून चालू हंगामात यशस्वीरीत्या ऊस गाळप हंगाम पूर्ण केला आहे.यावर्षी प्रतिकूल परिस्थितीत विक्रमी ८,४५,७३३ मे.टन उसाचे गाळप करून ९,५४,८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.सरासरी साखर उतारा ११.२९ टक्के राहिला.शेतकऱ्यांना पहिली उचल २८२५ रुपये प्रती टन पहिली उचल दिली आहे.आता शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करून पेरणी करता यावी तसेच मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या, पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार मिळावा याकरिता १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कराव्यात असे आ.आशुतोष काळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here