प्रलंबित ऊस थकबाकीसाठी रालोद ने केली निदर्शने

शामली : शेतकर्‍यांची राहिलेली थकबाकी आणि पेट्रोल डिजेलच्या वाढणार्‍या किंमतींच्या विरोधात रालोद कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोचून निदर्शनेकेली. रालोद चे म्हणणे आहे की, सरकार शेतकर्‍यांना दिलेले वचन पूर्ण करत नाही. जनतेला दिलासा देण्याऐवजी पेट्रोल डिजेल च्या किंमती वाढवल्यामुळे महागाई वाढली आहे. कार्यर्त्यांनी इशारा दिला की, या समस्यांचे निराकरण न झाल्यास रालोदला नाइलाजाने आंदोलन करावे लागेल.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीक लोकदलाचे जिल्हाध्यक्ष योंगेंद्र चेअरमन च्या नेतृतवामध्ये रालोद चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोचले. इथे विरोध प्रदर्शन करताना रालोद महासचिव अशरफ अली खान म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून साखर कारखान्यामध्ये शेतकर्‍यांच्या ऊस पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि बोगीची मोठी रांग लागल्यामुळे जवळपास 30 ते 40 तासानंतर ऊसाचे वजन झाले. ज्यामुळे शेतकर्‍यांचा ऊस घेवून साखर कारखान्या बाहेर उन्हात रांगेमध्ये उभे राहिल्यामुळे ऊस सुकला आहे. पाच टक्के ऊस वाळल्यामुळे शेतकर्‍यांचे 40 हजार क्विंटलचे नुकसान झाले आहे. कारखान्याला याची भरपाई द्यावी लागले. त्यांनी सांगितले, ऊस थकबाकी दिली जात नाही. यामुळे शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. ऊस हंगाम संपल्यानंतर ऊस थकबाकी न भागवणे हे गंभीर झाले आहे. रालोद जिल्हाध्यक्ष योगेंद्र चेअरमन म्हणाले, पेट्रोल आणि डिजेल च्या किंमतींमध्ये वाढ केली जात आहे. पेट्रोल च्या किंमतीत जवळपास 5 रुपयाची वाढ सरकारने केली आहे. हे चुकीचे आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी जास्त अडचणीत टाकले जात आहे. दरम्यान एसडीएम संदीप कुमार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदन देणार्‍यांमध्ये माजी आमदार राजेश्‍वर बंसल, चेअरमन जलालाबाद अद्बुल गफ्फार, रजनीश कोरी,डॉ . सउद हसन आदी सहभागी होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here