पीलीभीत: कारखाना बंद झाल्यानंतर बाहेरचे डझनभर कर्मचारी लॉकडाउनमध्ये अडकले आहेत. दोन महिन्याचा पगार न दिल्यामुळे आणि कपात केल्यामुळे नाराज कर्मचार्यांनी जीएम कार्यालयाबाहेर घोषणाबाची करत निदर्शने केली.
पुरनपूर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सत्र 15 एप्रिल ला संपले होते. यानंतरही बाहेरच्या सीजनल कर्मचारी पुन्हा घरी जातात. लॉकडाउन मुळे यावेळी कर्मचारी घरी जावू शकले नाहीत. साखर कारखान्यात देवरिया, कुशीनगर आणि गोरखपूर चे जवळपास 63 कर्मचारी यामध्ये अडकले आहेत. अधिक़ार्यांनी विनंती करुनही कर्मचार्यांना घरी पाठवण्यात आले नाही. यामुळे सोमवारी डझनभर कर्मचारी जीएम यांच्या निवासाबाहेर सोशल डिस्टंन्सचे पालन करत एकत्र आले. त्यांनी योग्य अंतर ठेवून निदर्शने केली. कर्मचार्यांनी सांगितले की, त्यांना दोन महिन्याचा पगार आणि तीन महिन्याचा ओवर टाइम दिला नाही. याबरोबरच एका दिवसाचा पगार कापला. कर्मचार्यांनी उर्वरीत पगार द्यावा आणि त्यांना घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी दुर्योधन, रामेश्वर, मनोज पांडे, चंद्रिका अनिरुद्ध राय, रविेंद्र राय, श्रीकांत गामा आदी कर्मचारी उपस्थित होते.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.