साखरेची MSP प्रति क्विंटल 4200 रुपये केली तरच साखर कारखानदारी टिकेल : वैभव नायकवडी

सांगली :केंद्र सरकारने चारवेळा उसाची एफआरपी वाढली तरी, एकवेळसुद्धा साखरेची MSP वाढलेली नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. जर साखरेची आधारभूत किंमत ४२०० रुपये केली, तरच साखर उद्योग अडचणीतून सावरेल, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगाम २०२४-२५ साठी रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. संचालक गौरव नायकवडी, वीरधवल नायकवडी, वसंत वाजे, विलास थोरात, संचालिका विशाखा कदम, उमेश घोरपडे, संजय अहिर, अजित वाजे, पै. नंदू पाटील उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून अनियमित पाऊस, कोरोना, ऊस तोडणी यंत्रणा कमी झाली, अशा अनेक अडचणी आल्या, तर एमएसपी न वाढल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारकडे सर्व मागण्या केल्या आहेत. लवकरच त्यांची पूर्तता झाली, तर साखर उद्योगाला चांगले दिवस येतील. या हंगामात साडेसहा मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागत केले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here