ऊस थकबाकी: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखर कारखानदारांना इशारा दिला

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी 2019-20 च्या गाळप हंगामाची प्रलंबित ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्यासाठी सांगितले आहे. लखनौमध्ये एक पुनरावलोकन बैठक घेतली. त्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अधिक़ार्‍यांना शेतकर्‍यांची थकबाकी वेळेत न भागवणार्‍या साखर कारखान्यां विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे ऊस शेतकर्‍यांचे करोडो रुपये देय आहेत. नव्या गाळप हंगामास जवळपास एका महिन्यापेक्षा अधिक वेळ बाकी आहे, पण साखर कारखान्यांकडून आतापर्यंत पूर्ण पैसे भागवले गेले नाहीत.

राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या हितरक्षणासाठी आणि सहकारी कारखान्यांची थकबाकी कमी करण्यासाठी अलीकडेच 24 सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य दिले आहे. सॉफ्ट लोनच्या रुपामध्ये साखर कारखान्यांना 500 करोड रुपयांचा निधी प्रदान केला आहे. जो संबंधीत कारखान्यांच्या पैसे भागवण्याच्या क्षमतेवर आधारीत आहे.

प्रशासनाने सांगितले की, ते पूर्ण प्रयत्न करत आहेत की, साखर कारखान्यांनी लवकरात लवकर थकबाकी भागवावी. साखर कारखान्यांच्या मतानुसार, साखर विक्रीमधील कमीमुळे त्यांना आर्थिक समस्येशी संघर्ष करावा लागत आहे, ज्यामुळे थकबाकी भागवण्यात ते अपयशी ठरले आहेत .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here