शामली : साखर कारखान्यांकडून गेल्या गळीत हंगामातील सर्व बिले अदा

शामली : अखेर शामली आणि थानाभवन साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले अदा केली आहेत. दोन्ही कारखान्यांकडून मिळून ३१.१९ कोटी रुपयांची थकबाकी होती. सध्याच्या गळीत हंगामात थानाभवन आणि शामली कारखाना एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. तर ऊन कारखान्याचे गाळप दहा नोव्हेंबर रोजी सुरू झाले. गेल्या गळीत हंगामात शामली कारखान्याने ३७४.६७ कोटी रुपये, ऊन कारखान्याने ३३७ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याने ४३९.९९ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. यावर्षी २३ जानेवारीपर्यंत ऊन कारखान्याने आपली गेल्या हंगामातील थकीत बिले अदा केली. तर शामली कारखान्याकडे ७७.२३ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे ४६.२० कोटी रुपयांची थकबाकी होती.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानसार, प्रशासनाने थानाभवन कारखान्याला २२ फेब्रुवारी आणि शामली कारखान्याला २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. २३ फेब्रुवारीपरयंत शामली कारखान्याकडे २५.९८ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे ५.२१ कोटी रुपयांची थकबाकी होती. ऊस विकास विभागाच्या अहवालानुसार, दोन्ही कारखान्यांनी गेल्या हंगामातील ३१.१९ कोटी रुपये ऊस समितीच्या माध्यमातून पाठवून दिले आहेत. होळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचतील. दोन्ही कारखान्यांनी थकीत बिले दिल्याच्या वृत्तास जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी दुजोरा दिला. मात्र सध्याच्या हंगामात शामली कारखान्याने अद्याप बिले दिलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here