गळीत हंगाम २०२१-२२: उत्तर प्रदेशमध्ये ऊस गळीत हंगामाची समाप्ती

पिलीभीत : यंदाचा, २०२१-२२ चा ऊस गाळप हंगाम संपुष्टात आला असून उत्तर प्रदेशातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत. या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी १०,१४६ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून १०२४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन उसाचे गाळप करून ११०.५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

सरकारी आकडेवारीनुसार, १० जून २०२२ पर्यंत चालू गळीत हंगामात आतापर्यंत २७,०६२.७८ कोटी रुपये म्हणजेच ७६.९९ टक्के ऊसाची बिले अदा केली आहेत. उसाची बिले देण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे. चालू गळीत हंगामातील १०० टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना लवकारत लवकर दिले जावेत यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या गळीत हंगामाचे जवळपास १०० टक्के ऊस बिले अदा झाली आहेत.

महाराष्ट्रानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक उत्तर प्रदेशमध्ये २०२१-२२ च्या हंगामात साखर उत्पादनात घट झाली आहे. साखरेच्या उत्पादनात झालेली घट मुख्यत्वे इथेनॉल उत्पादनात वाढ झाल्यामुळे झाली आहे. तसेच कीटकांच्या प्रादुर्भावामुळे देखील साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here