ऊस थकबाकी : शेतकरी पोहोचले साखर कारखान्यात, अधिकाऱ्यांनी सोडले कार्यालय

शामली : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेल्या ऊस बिलांबाबत विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी शामली साखर कारखान्याचे कार्यालय गाठले. मात्र, शेतकरी आल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडले. थकीत ऊस बिले न मिळाल्यास १५ ऑगस्टनंतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी शामली ऊस सहकारी संस्थेच्या कार्यालयात धडक दिली. मात्र, शेतकऱ्यांना पाहताच शामली साखर कारखान्याचे अधिकारी कार्यालयातून पळून गेले. घटनास्थळी उपस्थित असलेले अतिरिक्त ऊस महाव्यवस्थापक नरेश कुमार हे शेतकर्‍यांना उसाची थकबाकी भरण्याबाबत ठोस माहिती देऊ शकले नाहीत. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग, शामली ऊस समितीचे सचिव मुकेश राठी हेसुद्धा अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याचे ऊस कार्यालय गाठले होते.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनापर्यंत उसाची थकीत बिले न दिल्यास साखर कारखान्यावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देऊन शेतकरी माघारी फिरले. रणपाल सिंग, रामपाल सिंग, योगेश, निर्मल, करमपाल, रमेश, लाला, उदयवीर, यशपाल सिंग, सुधीर कौल खांडे, प्रताप सिंग, कृष्णा, मोनू, ओमपाल प्रजापती, राजपाल आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here