गडमुक्तेश्वर : ऊसाच्या थकबाकीमुळे भाकियूने १५ फेब्रुवारी रोजी सिंभावली साखर कारखान्याला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. रविवारी स्याना रोडवरील कॅम्प कार्यालयात भाकियूच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आंदोलनाची तयारी करण्यात आली. तर दहा कार्यकर्त्यांवर कारवाईही करण्यात आली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा यांनी सांगितले की, ब्रजनाथपूर आणि सिंभावली साखर कारखान्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून ऊस बिले वेळेवर मिळालेली नाहीत. ऊस कायदा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना थकीत बिलांवर व्याज दिले जात नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून सिंभावली कारखान्याच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून बेमुदत आंदोलन सुरू केले जाईल. यावेळी आंदोलनाची जबाबदारी त्या-त्या कार्यकर्त्यांवर निश्चित करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या तक्रारींबाबत प्रदेश अध्यक्ष राजवीर सिंह जादौन, राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी नारीज दर्शवली होती. त्यानंतर आता सरदार कुंवर सिंह, अमानत अली, आदेश प्रधान, आबिद अली, मुजाहिद चौधरी, सलीम, परवेज चौधरी, दिनेश शर्मा, सहादत चौधरी, बबलू चौधरी या कार्यकर्त्यांना पदावरुन हटविण्यात आले. बैठकीला महीपाल चौहान, दिनेश त्यागी, जीते चौहान, मुनव्वर अली, श्यामसुंदर त्यागी, मुबारक खां, नत्थी सिंह सैनी, उमेश चौहान, अनुज चौहान, आशु, तरुण, राकेश देवी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.