ऊस शेतकऱ्यांना थकबाकी भागवावी: खासदारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

चंडीगढ़: कांग्रेस खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी पुन्हा एकदा सहकारी कारखाने आणि खाजगी साखर कारखान्यांशी संबंधीत ऊस थकबाकीचा मुद्दा उठवला आहे.

जून 2020 च्या गेल्या पत्राचा हवाला देवून आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडून वित्त विभागाला ऊस थकबाकी भागवण्यासाठी 150 करोड़ रुपये भागवणे आणि आपल्या स्वयं स्रोतांकडून 149 करोड़ रुपये जारी करण्याच्या आदेशाबाबत, बाजवा यांनी सांगितले की, उर्वरीत पैसे अजूनही भागवले नाहीत.

त्यांनी मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांना विनंती केली आहे की, आपल्या निर्देशांना जवळपास सहा महीने झाले आहेत आणि तरीही 118.63 करोड़ रुपये अजूनही देय आहेत. नवा 2020-21 गाळप हंगाम सुरु झाला आहे आणि ऊस थकबाकी अजूनही देय आहे. सहकार विभागाला नाबार्डकडून 750 करोड रुपये सहायतेच्या रूपात मिळाले आहेत. मी आपल्याला निवेदन करतो की, या निधीमुळे प्रलंबित ऊस थकबाकी तात्काळ जारी करण्यासाठी विभागाला निर्देश द्यावेत. याप्रमाणे, खाजगी साखर कारखान्यांशी संबंधित जवळपास 129.61 करोड़ रुपये ऊसाचे पैसे लवकरात लवकर भागवले जावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here