टोल प्लाझावर टोलमधून सवलत देण्याची थेनी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

थेनी : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यापर्यंत ऊस नेताना टोल प्लाझामधील टोलपासून सवलत मिळावी अशी मागणी केली. थेनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के. व्ही. मुरलीधरन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी ही मागणी केली. याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस बिले देण्यास उशीर केला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना किमान साखर कारखान्यांकडे ऊस घेवून जातानाटोल प्लाझामधील टोलमधून सवलत द्यावी अशी मागणी केली.

बैठकीत काही शेतकऱ्यांनी खत टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. काही खत विक्री केद्रांवर ठराविक खते मिळविण्यासाठी त्यांच्या पसंतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्ह्यात पुरेशी खते उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, जिल्ह्यात १३,०१९ हेक्टरमध्ये भात, १३०२१ हेक्टरमध्ये बाजरी, ४०९० हेक्टरमध्ये कापूस आणि २४४० हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here