बरेली : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने लोकांना एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विभागात वादळी वाऱ्यामुळे भात, ऊस पिक भुईसपाट झाले आहे. गेल्या काही दिवसांत ज्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतात सिंचन केले, तेथील ऊस मोठ्या प्रमाणावर कोलमडला आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बहरोली गावातील राजीव गंगवार यांनी सांगितले की, २५ टक्के ऊस भुईसपाट झाला आहे. पिक कोसळल्याने त्याची मुळे उन्मळली आहेत. त्यामुळे कोल्हा, ऊस, गिधाडे यांच्याकडून पिकाला धोका आहे. कपूरपूरचे हरीश राजपूत यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे भात पिक कोसळले आहे. त्यामुळे त्याच्या तयार लोंब्यांचे नुकसान होणार आहे. समसपूरचे गड्डू वर्मा आणि कुल्छा खुर्द येथील ओमप्रकाश यांनी सांगितले की, जर हा पाऊस १५ दिवसांपूर्वी झाला असता, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता. धामपूर बायो ऑरगॅनिकचे व्यवस्थापक प्रदीप त्यागी म्हणाले की, ज्या शेतांमध्ये पाणी सोडले गेले होते, तेथील ऊस जोरदार वाऱ्यामुळे कोसळू शकतो. ऊस कोलमडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कारण, पुढील एका महिन्यात हंगाम सुरू होणार आहे.