नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी प्रलंबित एफआरपी बाबत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी संगितले की, नांदेडमध्ये प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम 2019-2020 संपल्यानंतरही एफआरपी नुसार शेतकर्यांच्या खात्यात ऊसाचे पैसे जमा केलेले नाहीत.
संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश पोपले यांनी इशारा दिला की, पुढच्या 15 दिवसांच्या आत जर प्रलंबित पैसे दिले गेले नाहीत, तर क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले जाईल. यावेळी जिल्हाअध्यक्ष हनुमंत पाटील, किशनराव कदम, नरहरी पोपले, शिवाजीराव वानखेडे, मारोतराव भांगे, एकनाथ कवले आदी उपस्थित होते.
Audio Player
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.